आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ बिल्लाळी ता. मुखेड जिल्हा नांदेड ही संस्था 1990 मध्ये बिल्लाळी येथे स्थापन करण्यात आलेली एक स्वयंसेवी संस्था आहे.

संस्थेअंतर्गत सन 1995 मध्ये मुक्रामाबाद सारख्या त्या काळातील ग्रामीण व दुर्गम भागामध्ये असणाऱ्या व लेंडी प्रकल्पामध्ये ज्या शेतकऱ्यांची शेती गेली अशा शेतकरी कष्टकरी कामगारांच्या गरीब मूकबधिर विद्यार्थ्यांकरिता निवासी शाळा स्थापन करण्यात आली. तसेच सन 1995 मध्ये मुखेड या शहरामध्ये अस्थिव्यंग विद्यालयाची स्थापना करण्यात आली.

विशेष शाळेचे महत्त्व

विशेष शाळा ही दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची संस्था आहे. जेथे बालकांचे ज्ञान, बुद्धी, संस्कार, विचार करण्याची कुवत घडते. शाळेत विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान दिले जात नाही, तर समाजामध्ये कसे वागावे, जगावे, वडीलधाऱ्यांचा आदर कसा करावा हे शिकविले जाते. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये विशेष शिक्षक यांचे स्थान एखाद्या देवदूता सारखे असते.

इतिहास

महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ बिल्लाळी ही संस्था 1990 मध्ये बिल्लाळी येथे स्थापन झाली.

1995 मध्ये मुक्रामाबाद या ग्रामीण व दुर्गम भागामध्ये लेंडी प्रकल्पामुळे पुनर्वसीत शेतकरी-कष्टकरी कामगारांच्या गरीब मूकबधिर विद्यार्थ्यांकरिता परिवर्तन निवासी मुकबधिर विद्यालय स्थापन करण्यात आली.

त्याच वर्षी मुखेड शहरामध्ये अस्थिव्यंग विद्यालयाची स्थापना करण्यात आली.

दृष्टी, उद्दिष्ट व मूल्ये

शाळेची दृष्टी

निवासी मुक-बधिर शाळा दिव्यांग विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष शिक्षण, कौशल्य विकास आणि स्वावलंबनावर भर देतात. मोफत निवास, भोजनासह संगणक प्रशिक्षण आणि खेळ यांसारख्या सुविधा उपलब्ध असतात. मुख्य ध्येय दिव्यांग विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने जीवन जगण्यास सक्षम करणे.

दृष्टी आणि मुख्य वैशिष्ट्ये

  • सर्वसमावेशक शिक्षण; कर्णबधिर विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण देऊन एकात्म शिक्षणासाठी प्रवृत्त करणे
  • सक्षमीकरण: कौशल्य-आधारित अभ्यासक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना रोजगारक्षम आणि स्वयंपूर्ण बनवणे
  • आधुनिक सुविधा: संगणक लॅब आणि क्रीडा सुविधा
  • मानसिक आधार: सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे

शाळेची मूल्ये

विशेष शिक्षण, निःशुल्क सुविधा, स्वावलंबन प्रशिक्षण, व्यावसायिक थेरपी (ADIP योजना), सामाजिक सक्षमीकरण.

शाळेचे ध्येय

दिव्यांग विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात वैयक्तिक गरजांनुसार विशेष शिक्षण, कौशल्य विकास आणि पुनर्वसन प्रदान करून स्वावलंबी, आत्मनिर्भर आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करणे. दैनंदिन जीवनातील कौशल्ये आणि श्रवण क्षमतेत सुधारणा करण्यावर भर.

व्यवस्थापन समित्या

खालील समित्या संस्था व शाळेच्या व्यवस्थापनासाठी कार्यरत आहेत. प्रत्येक समितीची तपशीलवार माहिती वेगळ्या पृष्ठावर उपलब्ध आहे. ॲडमिन डॅशबोर्ड मधून पृष्ठे > संबंधित समिती संपादित करून अपडेट करता येईल.